बीएसएनएल कार्ड विक्री बरोबर जनजागृती संदेश
जळगाव जामोद :प्रतिनिधी
बीएसएनएल कार्ड विक्री बरोबर जनजागृती संदेश देत आहे शेख सलीम सध्या देशामध्ये जिओ वीआय एअरटेल या सर्वच दूरसंचार कंपन्यांची रिचार्ज मध्ये वाढ झाल्यामुळे भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीची स्वस्त व फायदेशीर आहे त्यामुळे आज फार मोठ्या प्रमाणात पोर्टेबिलिटी व नवीन सिम कार्ड घेण्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात बीएसएनएल कडे वाढत आहे याचे परिणाम बीएसएनएल ला पूर्वीचे दिवस यायला आता वेळ लागणार नाही बीएसएनएल फायबर हाय स्पीड इंटरनेट व लँडलाईन सुविधा कडे ग्राहक मोठ्या प्रमाणात जुळत आहेत बुलढाणा बीएसएनल विभागात अतिशय चांगले अधिकारी वर्ग असल्यामुळे जिल्हा वासियांना सुविधा अभाव राहणार नाही याची खात्री ते देत आहे
ग्राहक जोडून ठेवणे व त्यांना दर्जेदार सुविधा मिळवून देणे हे बीएसएनएलचे आद्य कर्तव्य असून ह्या जनजागृतीला लोकांना समजणे काळाची गरज आहे एवढे मात्र खरे आहे या अभिनव उपक्रमाला लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे














